भारतीय वार्ता प्रतिनिधी,
राज्यातील महापूरानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत पूरग्रस्त भागात मदत पोहोचत आहे. पाटाळा अशाच 'जनसेवा युवक, ग्रामपंचायत सदस्य, संदीप एकरे या स्वयंसेवीकाने सामाजिक भान जपत पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊ केला.
चंद्रपूर भद्रावती तालुका येथील पाटाळा जवळच्या गावांना 'झळ पोचली असून गावातील युवकांनी अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली. यात तांदूळ, डाळ, साखर, साबण, टूथपेस्ट अशा दैनंदीन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.
वर्धा नदीच्या काठावर बसलेल्या गावाला महापूराचा फटका बसला आहे. गावात जवळपास 3 ते 5 फूट पाणी साचलं होतं. अनेकांच्या घरांचं नुकसान झालं. पूर ओसरल्यानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यात नागरिकांना मदतीचा हातभार लागावा यासाठी पाटाळा युवक प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन मदत देऊ केली. गावातील पूर बाधितांनाही मदत करण्यात आली व ती आजही चालूच आहे.
"तालुक्यातील महापूराची भीषण परिस्थिती लक्षात घेता पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे करणं हे स्वयंसेवी संस्थांचं कर्तव्यच आहे. पूर ओसरला असला तरी गावकऱ्यांचं झालेलं नुकसान हे काही भरून निघणारं नाही. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्यासाठी पूरग्रस्तांना शक्य तितकी मदत करण गरजेचं आहे.भावुक होऊन संदीप एकरे यानी केले, ही वेळ एकट्याच्या मदतीची नसून आपआपल्यापरी मदत करून भाऊ बंध जपण्यासाठी एकोप्याने मदत करा ही वेळ शैर्य लाटण्याची नसून मदत करण्याची आहे ही भारतीय संस्कृती असून त्याचे जतन करूया. असे भावुक आव्हान केले.दानशुराणी संदीप एकरे मो.9503077601,9923314740, पांडुरंग आगलावे मो.8806029739, उमेश आगलावे मो.9518360828, सुजय खीरडकर मो.7766920816, विजय वानखेडे मो.9923377687, बालाजी खीरडकर मो.9890061152या गावकरी युवकांसी संपर्ग करून मानव जीवन कार्यास मदत करण्याचे आव्हान भारतीय वार्तासी बोलताना व्यक्त केले व मानवाला दान हेच खरे ईश्वर पुण्य राहतील असे भावुक उदगार व्यक्त केले.