चांगल्या योजनेच्या मागे चांगलेच फलित मिळत असतात हेच योग्य कार्याचे फलित होय, ते पाणी देण्याच्या माध्यमातून समोर येत आहे : सौ. विठाबाई भीमसेन कोडापे (सरपंच)
शिरपूर (प्रतिनिधी ): वणी प . स . अंतर्गत येत असलेल्या बेलोरा ग्रामस्थानचे वे .को.ली. ने पुनर्नियोजन करून बेलोरा ग्रामस्थानची वस्ती निर्माण झाली. अश्या या निवासीत वस्तीला आता मात्र मिळणार नळाचे पाणी. सन २०१९ - २०२० मध्ये बेलोरा खुल्या खदानीचे विस्तारीकरण करण्याच्या हेतूने पाऊल उचलले असता तत्कालीन सरपंच प्रकाश भा. खुटेमाटे यांनी पाणी , नियोजन , आरोग्य आणि शेतीबाह्य बेरोजगार या विषयात लक्ष केंद्रित करून समस्यांचे निराकरण करण्याची मागणी प्रशासक व प्रशासन यांना केली असता खनिज विकास निधीतून आमदार बोदकुलवार साहेब व तत्कालीन खनिज विकास प्रतिष्टान चे सदस्य विजयभाऊ पिदूरकर यांच्या माध्यमातून 43 लाख रुपयाच्या नळ योजनेचे काम गावकरता मंजूर करण्यात आले व सदर काम इ टेंडरिंग द्वारे देण्यात आले.
तहानलेल्या गावाला पाणी देऊन अमृताप्रमाणे जिवंत करण्याचे कार्य केल्या जात आहे : सौ. आर्तिका राजेन्द्र राखुंडे (माजी उपसरपंच )
जल हे जीवन असून ते तहानलेल्या पर्यंत पोहचवणे हेच आमचे कर्तव्य : श्री भाऊराव गणपत लोडे (ग्रा. सदस्य बेलोरा)
त्या कंपनीने सदर काम काही महिन्यापूर्वी पूर्वरत करून गावांतर्गत पूर्ण पाईप लाईन आणि पाण्याची टाकी ६०,००० लिटर क्षमता निर्मितीचे काम झाले असतांना मागील कोरोना प्रोटोकॉल व ग्रामपंचायत प्रशासन निवडणूक या कारकिर्दीच्या विलंबनाने पाणी क्षमता असतांना विलंबनाचे कारण समोर आले असता पाणी हेच जनजीवन यातून ग्रामपंचायत प्रशासनाने व विद्यमान सरपंच्या सौ विठाबाई भी. कोडापे यांच्या मार्गदर्शनात दि. १/४/२०२१ पासून बेलोरा ग्रामपंचायत मधील ३ हि वॉर्डाकरिता ऐकून लोकसंख्या १७०० असलेल्या ग्रामस्थांना तानेची दाहकता पूर्ण करण्याचे काम पूर्वव्रत स्थितीत येऊन ठेपले असून आता पाणी मिळणार या आशेने ग्रामवासी आनंद द्विगुणित करीत आहे.