Home / यवतमाळ-जिल्हा / मारेगाव / यवतमाळ जिल्ह्यातील...

यवतमाळ-जिल्हा    |    मारेगाव

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी
ads images

> परदेशातील कृषी तंत्रज्ञान व उत्पन्नातील वाढीचा अभ्यास करता येणार,३१ जानेवारीपूर्वी तालुकास्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, ५० टक्के रक्कम ते एक लाख रुपयांपर्यंत अनुदान

यवतमाळ,दि.२४ : परदेशात विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान व शेतकऱ्यांनी केलेला अवलंब आणि उत्पन्नात झालेली वाढ याचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याची संधी मिळणार आहे. या दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी परिपूर्ण प्रस्ताव ३१ जानेवारी पूर्वी तालुकास्तरावर सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढवणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडित घटकाबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यापर्यंत त्यांच्या गरजेनुरूप योग्य वेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक साह्य व सोयी सुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपयोजनासाठी कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

विविध देशांनी विकसित केलेले शेती विषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षेत्रिय भेटी तसेच संस्थांना भेटी इत्यादी द्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेअंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरीता सर्व घटकातील शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे.या योजनेअंतर्गत शेतकरी निवडीचे निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार या अभ्यास दौऱ्याकरिता जाणारा लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा सातबारा व आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असावी व तसे त्याने स्वयंघोषणा पत्रात नमूद करावे. शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. निवडलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांने स्वखर्चाने जरी इतर कुटुंब सदस्यास सोबत घ्यायचे असले तरी सहल व्यवस्थापनास येणाऱ्या संभाव्य अडचणीमुळे त्यास परवानगी दिली जाणार नाही. सोबत शिधापत्रिकेची झेरॉक्स प्रत जोडावी. शेतकऱ्यांने त्याच्या आधार प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे. शेतकरी किमान बारावी पास असावा, बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.  शेतकऱ्याचे वय सहलीला निघण्याच्या दिवशी किमान पंचवीस वर्षे पूर्ण व सहल समाप्त होण्याच्या अंतिम दिवशी साठ वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यासाठी पार पत्रानुसार वयाची पडताळणी करण्यात येईल. शेतकरी वैध पारपत्रधारक (पासपोर्ट ) असावा, पुराव्यासाठी पारपत्राची मुदत किंवा वैधता दर्शविणाऱ्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी. पार पत्राची वैध मुदत दौरा निघण्यापूर्वी किमान सहा महिने असावी.

शेतकरी शासकीय निम शासकीय सहकारी, खाजगी, संस्थेत नोकरीत नसावा, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, वकील सीए, अभियंता, कंत्राटदार इत्यादी नसावा तसे त्यांने स्वतः स्वयंघोषणापत्रात नमुद करावे.  शेतकऱ्याने यापूर्वी शासकीय अर्थसहाय्याने विदेश दौरा केलेला नसावा तसेच त्यांनी स्वतः स्वयंघोषणापत्रात नमूद करावे. शेतकऱ्याची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याचे पत्र कृषी विभागाकडून मिळाल्यानंतर शेतकऱ्याने परदेश दौऱ्यासाठी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र किमान एमबीबीएस डॉक्टरचे सादर करावे.

कोरोनाविषयक तपासणी करून तसा अहवाल कृषी आयुक्तालय सादर करणे बंधनकारक आहे. या अहवालानुसार शेतकऱ्यास कोणत्याही प्रकारच्या संसर्गजन्य रोगाची लागण झाली नसल्याचे तसेच सात ते दहा दिवस कालावधीच्या परदेश दौरा करण्यासाठी शरीरिक दृष्ट्या पात्र असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित करणे आवश्यक राहील.

या योजनेच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्याकरिता तीन चे लक्षांक प्राप्त आहे. अनुदानाच्या तपशीला विषयी सविस्तर माहिती, शेतकरी निवडीची कार्यपद्धती, शेतकऱ्यांनी पाळावयाच्या अटी व शर्ती इत्यादी बाबत अधिक माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी. तसेच दौऱ्याकरिता इच्छुक शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर परिपूर्ण प्रस्ताव ३१ जानेवारी २०२४ पूर्वी सादर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

मारेगावतील बातम्या

शेतकऱ्याला त्रास द्याल तर गाठ माझ्याशी आहे - राजु उंबरकर

मारेगाव:महावितरण विभागाने देखभाल दुरुस्तीची कामे येत्या २ दिवसात पूर्णत्वास न्यावी व वारंवार होत असलेला विद्युत...

*विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू*

*विजेच्या धक्याने तरुण कामगाराचा मृत्यू* ✍️रमेश तांबेवणी तालुका प्रतिनिधी वणी:-मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा)...

छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार चालवणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर-विकास चिडे (राष्ट्रीय प्रबोधनकार)

मारेगाव:छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार सांभाळणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.अहिल्यादेवी...