Home / चंद्रपूर - जिल्हा / भद्रावती पोलिसांचा...

चंद्रपूर - जिल्हा

भद्रावती पोलिसांचा विनाकारण बाहेर फिरणा-यांची अँटिजण चाचणी..

भद्रावती पोलिसांचा विनाकारण बाहेर फिरणा-यांची अँटिजण चाचणी..

भद्रावती:  विनाकारण रस्त्याने फिरणा-या लोकांसोबतच कारणाने फिरणा-या नागरिकांनाही अडवून त्यांची अॅंटीजेन चाचणी केल्याने आतातायीपणा करणा-या पोलिसांबद्दल भद्रावती शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि.२२ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान येथील नगर परिषद कार्यालयासमोर पोलिसांनी रस्त्याने जाणा-या येणा-या नागरिकांना अडवून त्यांची नगर परिषदेच्या तळमजल्यावरील एका ब्लाॅकमध्ये अॅंटीजेन चाचणी करणे सुरु केले. मात्र ही चाचणी विनाकारण फिरणा-यांची होती की सरसकट या रस्त्याने जाणे-येणे करणा-या सर्वांचीच होती.हे कळायला मार्ग नाही. कारण पोलिसांनी या रस्त्याने जाणा-या येणा-या सर्वच नागरिकांची अॅंटीजेन चाचणी करुन टाकली. एकीकडे रस्त्याने विनाकारण फिरणा-या लोकांची चाचणी करणे योग्य आहे. परंतू जे नागरिक आपल्या नोकरीवरील  कर्तव्य बजाविण्याकरीता आपल्या कार्यालयात जात असतील, त्यांनाही विनाकारण फिरणारे म्हणून त्यांच्यावर कारवाई करणे योग्य आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

  विशेष म्हणजे येथील एका शाळेतील एक महिला कर्मचारी आपले कर्तव्य बजावून आपल्या घराकडे परत जात होती. तीला पोलिसांनी अडविले व अॅंटीजेन चाचणी करायला लावले. ती वारंवार पोलिसांना सांगत होती की, मी माझ्या कार्यालयातून कर्तव्य बजावून घरी जात आहे. तरीदेखील पोलिसांनी तिचे काहीही ऐकले नाही. शेवटी तिला खुप भूक लागली असताना रांगेत उभी राहून चाचणी करावी लागली. शिवाय रिपोर्ट मिळेपर्यंत ताटकळत राहावे लागले. त्यामुळे तिला मनस्ताप झाला.  रोज आपल्या कार्यालयात कर्तव्य बजाविण्याकरीता कसे जायचे ? असा प्रश्न तिच्यासमोर निर्माण झाला आहे. पाझिटीव्ह रिपोर्ट आल्यास रिपोर्ट दिला जातो. मात्र निगेटीव्ह आल्यास रिपोर्ट दिल्या जात नाही. त्यामुळे चाचणी करणा-याकडे चाचणी केल्याचा पुरावा राहत नाही. मग त्याने रोज चाचणी करायची का हे  विशेष  सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत बॅंक कर्मचा-यांची वेळ असते. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर घरी जाताना रस्त्यात अॅंटीजेन चाचणी करुनच बॅंक कर्मचा-यांना घरी जावे लागेल. त्यात निगेटीव्ह रिपोर्ट आला, तर परत दुस-या दिवशीही पुन्हा चाचणी करावी लागेल. पत्रकारांना वृत्त संकलनासाठी अडवू नये असे शासनाचे धोरण असताना पत्रकारांनाही पोलिसांनी अडवुन चाचणी करण्यास सांगितले जात होते. याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला असता विनाकारण फिरणा-या लोकांसाठी ही चाचणी असल्याचे सांगितले.विशेष म्हणजे ग्राम पंचायत निवडणुकीच्या निकालाचे वृत्त संकलन करण्याकरीता मतमोजणी केंद्रावर गेलेल्या पत्रकारांना निवडणुक अधिका-यांनी दिलेले प्रवेशपत्र असताना पोलिसांनी अडविले होते. 

 याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संजय आसुटकर यांना विचारणा केली असता जे लोकं विनाकारण फिरतात त्यांचीच अॅंटीजेन चाचणी करायची आहे असे सांगितले. मग  भद्रावती पोलिस सरसकट कारण आणि विनाकारण फिरणा-या लोकांची चाचणी का करतात या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...