घुग्गुस : नकोडा ते मुंगोलीच्या वर्धा नदी पुलावरून दुचाकी व सायकलची वाहतूक सुरू करा अशी मागणी चंद्रपुर व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंचांनी केली होती.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची पाहणी केली.तसेच वेकोली प्रशासनाला निर्देश दिले होते.
मुंगोली पुलिया कमजोर झाला असून मागील सात ते आठ महिन्यांपासून वर्धा नदीवरील मुंगोली पुलिया वरून वाहतूक बंद होती.त्यानंतर वेकोली प्रशासनाने पर्यायी मार्ग म्हणून मातीचा रस्ता तयार केला मात्र तो सुद्धा वाहून गेला.त्यामुळं घुग्गुस-वणी-मुंगोली मार्ग बंद होता त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
मुंगोली पुलियाचे काम अजूनही वेकोली व संबंधित अधिकाऱ्यांनी सुरू केले नाही.परिणामी मागील सात ते आठ महिन्यांपासून येथून कोळसा वाहतूक व हलके वाहनांना जाण्यासाठी मार्ग बंद करण्यात आला.याचा नाहक त्रास मात्र परिसरातील पन्नास गावातील सर्वसामान्य नागरिकांना होत होता. त्यामुळे मुंगोली पुलियावरून दुचाकी व सायकलची वाहतूक सुरू करावी अशी मागणी करण्यात आली होती.
त्यानंतर आज शुक्रवारपासून प्रवासकांना गुलाबाचे फुले देऊन,किर्तण,भजन,करून पुलावरून दुचाकी व सायकल वाहतूक सुरू झाली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ईबादूल सिद्दीकी, विजय पिदुरकर, निलेश पिंपळकर सरपंच साखरा, गणेश जेणेकर सरपंच कोलगांव,ज्योती मामुलकर सरपंच माथोली,शालिनी सलाम चिचोली सरपंच, विस्वास बोरपे सदस्य शिवणी, निखिल उपासे सदस्य साखरा,कुनाल डोटे सदस्य माथोली,जिवन अतकारे सदस्य मुंगोली, गणेश रोडे माजी उपसरपंच मुंगोली, सुधाकर बोबडे, माजी उप-सरपंच मुंगोली,