वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
Reg No. MH-36-0010493
✍️दिनेश झाडे
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
सावली:-20 ऑगस्ट 2023 भारतातील माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्रांतीचा पाया रोवणारे,भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान,भारतरत्न स्व.राजीव गांधी यांची आज ७९ वी जयंती आहे. दरवर्षी हा दिवस दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. राजीव गांधी सद्भावना पुरस्कार त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर 1992 मध्ये या दिवशी सुरू करण्यात आला. वयाच्या 40 व्या वर्षी राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले. राजीव गांधी 1984 ते 1989 पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. भारतासाठी त्यांची दृष्टी आणि समाजाच्या भल्यासाठी त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.
भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून पाहण्याची त्यांची नेहमीच इच्छा होती. त्यांनी 1986 मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण, परवाना राज कमी करणे आणि पंचायती राज समाविष्ट करण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या धोरणांचे पालन करून देश आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राजीव गांधी जयंती सद्भावना दिवसाबरोबरच हा राजीव गांधी अक्षय ऊर्जा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 1992 मध्ये राजीव गांधी सद्भावना पुरस्कार त्यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर सुरू केला.माजी पंतप्रधानांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जाणारा या दिवसाचा संदेश हा आहे की, देशात सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र राहावे. तरुण पीएम सरकारचे ध्येय लोकांना इतरांबद्दल चांगल्या भावना असणे, बंधुता, समुदाय सौहार्द, ऐक्य, प्रेम आणि सर्व धर्मांच्या लोकांमध्ये आपलेपणा राखण्यासाठी प्रेरित करणे हे होते.आज सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज स्व.राजीव गांधी यांना पुष्प, हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लता लाकडे,युवक काँग्रेस शहराध्यक्ष मा.अमर कोनपत्तीवार,न.प.बांधकाम सभापती सौ.साधना वाढई,पाणीपुरवठा,आरोग्य व स्वच्छता सभापती मा.अंतबोध बोरकर नगरसेवक मा.प्रफुल वाळके,मा.प्रीतम गेडाम, मा.नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.सिमा संतोषवार,सौ.प्रियंका रामटेके,सौ.अंजली देवगडे, पल्लवी ताटकोंडावार,मा.नितीनजी दुवावार,मा.आकाश खोब्रागडे, सौ.कविता मुत्यालवार, सौ.संगीता गेडाम, जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम, मा.बादल गेडाम सन्मानिय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता गण,काँग्रेस पक्षाचे फ्रंटल आर्गनाईजेशनचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्व.राजीवजी गांधी यांची ७९ वी जयंती साजरी करण्यात आली.
वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...
वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...
: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...
वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...
वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....
वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...
*काँग्रेसच म्हणू ,काँग्रेसच आणू सावली तालुक्यातील नागरिकांची सकारात्मक भूमिका* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सावली...
*सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न* *गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे...
*सावली बसस्थानकाच्या विविध बांधकामासाठी एक कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन संपन्न* *विरोधी पक्षनेते मा.विजयभाऊ...