Home / चंद्रपूर - जिल्हा / चंद्रपूर / *कायदा सुव्यवस्था राखण्यात...

चंद्रपूर - जिल्हा    |    चंद्रपूर

*कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा- ना.सुधीर मुनगंटीवार*

*कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा- ना.सुधीर मुनगंटीवार*

कायदा व सुव्यवस्थेत चंद्रपूर राज्यात अग्रेसर राहावा

 

 

 

 

*गाव पातळीवर पोलीस पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी*

 

*चंद्रपूर, दि. 25*:  शहरात सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांप्रमाणेच नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा असून कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहावा, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित पोलीस एक्स्पो कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, शिक्षणाधिकारी(माध्य.) कल्पना चव्हाण आदी उपस्थित होते

 

समाजामध्ये पोलीस आदर्श नागरिक असून समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पोलिसांप्रमाणेच कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी नागरिकांची देखील आहे. आदर्श गाव होण्यासाठी तसेच गाव पातळीवर किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्हे रोखण्यासाठी पोलीस पाटील हा महत्त्वाचा घटक आहे. समाज व पोलीस पाटील यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अग्रेसर व्हावा, इतरांनी या जिल्ह्याच्या प्रशासनाचा हेवा करावा, पोलीस विभागाचे कौतुक करावे असे काम जिल्ह्यात व्हावे. नवचैतन्य प्रदर्शनीतून  गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत चैतन्य पोहोचवायचे आहे. पोलीस विभागाला भौतिक संसाधनाची आवश्यकता असल्यास त्या सर्व संसाधनासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले.

 

पुढे बोलतांना ना. मुनगंटीवार म्हणाले, सर्वंकष समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन सामूहिक भावनेने विचार करण्याची आवश्यकता आहे. कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे करावी. जेणेकरून, कायदा तोडण्याची हिंमत कोणीही करणार नाही. त्यासाठी जिल्ह्यात व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून व्यसनमुक्ती संदर्भात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. जिल्ह्यात दारूबंदी असताना अपघातात 131 लोकांचा तर दारूबंदी उठविल्यानंतर 450 लोकांचा मृत्यू झाला. व्यसनमुक्तीचा संकल्प केला मात्र, संकल्प करून पुढे न जाता व्यसनमुक्तीची चळवळ जिल्ह्यात उभी करावी. नशा ही दारू, व्यसनाची नसावी तर ती उत्तम गुणांची असावी, असेही ते म्हणाले.

 

अर्थमंत्री असताना पोलीस पाटील यांचे मानधन वाढवून दिले.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे पर्यंत त्यांच्या असलेल्या मागण्या पोहोचविण्यात येईल. पोलीस पाटील यांनी जनतेचे विषय घेऊन आपला जिल्हा महाराष्ट्रात उत्तम व्हावा, या दृष्टीने प्रयत्न करावे तर जिल्हा नेहमी अग्रेसर राहावा हा भाव घेऊन कार्य करावे. असेही ते म्हणाले.यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवचैतन्य प्रदर्शनीच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांचे कौतुक केले

 

*पोलीस पाटील मार्गदर्शिकेचे अनावरण:*

पोलीस प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या पोलीस पाटील मार्गदर्शकेचे अनावरण पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले.

ताज्या बातम्या

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम 12 May, 2024

नंदीग्राम एक्स्प्रेस व साप्ताहीक रेल्वे गाड्यांना मुकुटबन येथे थांबा द्या-सुरेंद्र गेडाम

झरी: तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव मुकुटबन येथे बिर्ला कंपनीचे सिमेंन्ट प्लान्ट तसेच कोळसा खदानी...

 घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू. 12 May, 2024

घुग्गुस येथे दारूच्या नशेत असताना झालेल्या भांडणामुळे एकाचा मृत्यू.

घुग्घुस : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या बस्ती येथील तळब येथे असलेल्या दीक्षित दारू दुकानाच्या मागे दारू पिऊन दोघे...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास. 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा, पावसामुळे चिखल साचून रस्ता होतो बंद, उकणीवासीयांना नाहक त्रास.

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा* 12 May, 2024

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य करा*

*राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेचा अभाव अपघातात वाढ जि आर आय एल कंपनीवर गुन्हा दाखल करूण मुतकाच्या कुटुंबाला अर्थसहाय्य...

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा 12 May, 2024

उकणी-वणी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करा, संजय खाडे यांचा इशारा

वणी- उकणी-वणी या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा रस्ता संथगतीने तयार होत असल्याने परिसरात पाऊस आला की चिखल साचल्यामे...

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार? 11 May, 2024

मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?

वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...

चंद्रपूरतील बातम्या

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष धोटे*

*प्रतिभा धानोरकरांचा विजय निश्चित: कार्यकर्त्यांनी विधानसभेत विजयश्री खेचून आणण्यासाठी कामाला लागावे : आमदार सुभाष...

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार*

*मत विकणे म्हणजे स्वतःचे भविष्य विकने:- नंदू भाऊ गट्टूवार* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर:-जेव्हा...

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक*

*पोलीस रक्षकच झाले भक्षक* *एलसीबीचे पोलीस हवालदार संजय आकुलवार यांना केली अटक* ✍️राजेश येसेकरभद्रावती चंद्रपूर...