Home / चंद्रपूर - जिल्हा / देशाच्या विकासात राजीव...

चंद्रपूर - जिल्हा

देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा     - बाळू धानोरकर 

देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा     - बाळू धानोरकर 

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मास्क,सॅनिटायझर वाटप 

चंद्रपूर: स्व. राजीव गांधी यांनी देशात डिजिटल क्रांती घडविली. १८ वर्षे वयोगटातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, असा निर्णय घेतला. पंचायत राज बळकटीकरणासोबतच सर्वसामान्य नागरिकांना समोर ठेवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. देशात विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे देशाच्या विकासात राजीव गांधी यांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात स्व. राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार २१ मे रोजी  आयोजित कार्यक्रमात खासदार धानोरकर बोलत होते. यावेळी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कस्तुरबा चौकात मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले. 
               जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना मदत व्हावी या उद्देशातून शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सहायता कक्ष सुरू केले आहे. या कक्षाच्या माध्यमातून कोरोना रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना चोवीस तास मदत केली जात आहे. प्रत्येक नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. तरीदेखील आलेल्या संकटकाळात काँग्रेस पक्ष प्रत्येकांच्या पाठिशी अविरत उभा राहणार असल्याचे आश्वासन यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी यावेळी दिले.   
                 यावेळी शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई खोब्रागडे, माजी नगरसेवक प्रवीण पड़वेकर, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, ओबीसी विभाग शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे, ओबीसी विभागाचे प्रदेश महासचिव उमाकांत धांडे, माजी नगरसेवक राजेश रेवल्लीवार, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, माजी नगरसेवक बापू अंसारी, एनएसयुआय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय सचिव मोहन डोंगरे, पप्पू सिद्दीकी, राजू वासेकर, केतन दुरसेल्वार, मोनू रामटेके, वैभव येरगुडे, कासिफ अली, धरमु तिवारी, मिनल शर्मा, आकाश तिवारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
                      जिल्ह्यात सध्या कोरोनाने हाहाकार माजविला आहे. शहरापासून गावखेड्यापर्यंत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खासदार निधीतून चंद्रपूर शहर व जिल्ह्यासाठी दोन स्वर्गरथ आणि दहा रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याचे आश्वासन खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी केले. चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला .

ताज्या बातम्या

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन. 20 May, 2024

वीज समस्येवर काँग्रेस आक्रमक, महावितरण कार्यालयावर धडक, संजय खाडे यांच्या नेतृत्त्वात महावितरणला निवेदन.

वणी - वणी शहरासह वणी तालुक्यात विजेचा खोळंबा सुरु आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. थोडा ही वारा...

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था. 20 May, 2024

श्री. महाविर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम, वणी रेल्वे स्टेशन वर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने केली व्यवस्था.

वणी:- वणी रेल्वे स्टेशन वरून काही वर्षांपूर्वी नंदिग्राम रेल्वे सुरू करण्यात आली होती. या रेल्वेमुळे नांदेड, परभणी,...

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती. 20 May, 2024

बेलोरा चेकपोस्ट येथील हनुमान मंदिराजवळ रस्ता अपघात : एक ठार, दोन जखमीला नागपुर खाजगी रुग्णालयात भरती.

: वणी तहसीलच्या शिरपूर पोलीस ठाण्यांतर्गत वणी-घुग्घुस रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळ झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार...

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन 19 May, 2024

वणीत भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन

वणी- वणीकर सध्या भीषण पाणी समस्येला तोंड देत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना...

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन. 17 May, 2024

वणी शहरात भीषण पाणी समस्या, काँग्रेस आक्रमक. संजय खाडे यांच्या उपस्थितीत मुख्याधिका-यांना निवेदन.

वणी:- वणीकर नागरिकांना सध्या भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही ठिकाणी महिन्यात केवळ दोन वेळा पाणी येत आहे....

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला. 17 May, 2024

पाळीव श्र्वाना (कुत्र्या) मुळे अनर्थ टळला.

वणी: दिनांक १६ .मे रोजी मुकूटबन येथील रहिवासी असलेले रमेश चिटलावार यांचा घरी रात्री ११.४५ सुमारास घरचे सर्व सहाही...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात*

*सुरक्षेचा अभाव बातमी झळकताच महामार्ग कंत्रटदार खळबळून जागे? ठिक ठिकाणी रस्ते बंद करण्याला सुरुवात* ...

१ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य,सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय : डॉ. अशोक जीवतोडे

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार...

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी पूढे सरसावले विजय वडेट्टीवार*

*विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली येथे आर्थिक मदत....* *जनसंपर्क कार्यालय प्रमुख,सावलीच्या वडिलांच्या तबेतीसाठी...