Home / आरोग्य / "लस घेऊन विषवंत होऊ नका...

आरोग्य

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

कोरोना हा अनेकांनी केवळ तर्काच्या आधारे नाकारला तर अनेकांनी तो वैज्ञानिकदृष्ट्या उघडा नागडा करून त्याला असतित्वहीन करत नागरीकांना न घाबरण्याच आव्हाण केल.

"लस घेऊन विषवंत होऊ नका !"

✍️ नवनाथ दत्तात्रय रेपे
(भट बोकड मोठा पुस्तकाचे लेखक)
      मो.९७६२६३६६६२

 

कोरोना या बनावट रोगाचा बागुलबुवा उभा करून देशाच्या राजकारण्यांनी अर्थव्यवस्थेच कंबरड मोडलं. त्यात राज्य आणि केंद्र सरकार हे दोन्हीही तेवढेच जिम्मेदार आहेत, जेवढे येथिल फार्मा लँबीतील पदाधिकारी व राजकीय नेते आणि त्यांचे गल्लीतले अंधभक्त आहेत. कोरोना हा अनेकांनी केवळ तर्काच्या आधारे नाकारला तर अनेकांनी तो वैज्ञानिकदृष्ट्या उघडा नागडा करून त्याला असतित्वहीन करत नागरीकांना न घाबरण्याच आव्हाण केल. त्यात महाराष्ट्रात सोशल हेल्थ मुव्हमेंटच्या वतीने हर्षद रूपवते, के. रामभाऊ, संजय वाघमारे, विजय सोनवणे, प्राची लोखंडे, डाँ. मुनकिन मुजावर व डाँ. जगदीश लांबे तसेच अव्हेकन इंडीयाच्या माध्यमातून अँड. निलेश ओझा व वेळोवेळी प्रसारमाध्यमातून कोरोना षढयंत्र आहे अस मांडणारे दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी कोरोनाचा भांडाफोड करून भयभित झालेल्या नागरीकांना भयमुक्त करून विषारी व विनाशकारी लसीपासुन अनेकांचा जीव वाचवला त्याबद्दल त्या सर्व टिमच अभिनंदन. पण ज्यांच्या मेंदुची वाढ खुंटली त्यांना कितीही आरडून ओरडुन सांगितले की, बाबाहो कोरोनाला घाबरू नका. तो आहे याचा पुरावाच नाही, कोरोना हा केवळ एक बागुलबुवा आहे. त्यामुळे घाबरून लसीच्या माध्यमातून दिल जाणार विष शरीरात घालून घेऊ नका. असे प्रत्येकवेळी प्रत्येकदिवशी सोशल हेल्थ मुव्हमेंटचा पदाधिकारी ते सामान्य कार्यकर्ता सांगत होता पण त्याचं ऐकण्याऐवजी त्यांना वेड्यात काढण्यासाठी सोशल मिडीयावर झुंडीच्या झुंडी कार्यरत होत्या. त्या झुंडीचे मुकादम म्हणून काही चक्रम भोंदू वैद्य काम पाहत इतरांना ट्रोलिंग करत लस चांगली आहे म्हणत आभाळ हेपलून लोकांना मरणाच्या दाढेत ढकलत होते. एवढा इतिहास सांगायच कारण की, आज लसीचे दोन व बुस्टरचा एक डोस घेणारेही कोरोना बाधीत होताना दिसत आहेत तेव्हा लस चांगली म्हणून आभाळ हेपलणा-या चक्रम वैद्यांची टाळू पायतनाने का सडकू नये ?हा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. म्हणून तर हर्षद रुपवते हे त्यांच्या 'खेळ कुणाला अफवांचा कळला !' या अग्रलेखात म्हणतात की, कोरोना महामारी ही एक अफवा आहे आणि न्यू वर्ल्ड आँर्डरचा एक अजेंडा २०३० लागू करण्यासाठी या अफवेला सेंटर पाँईट बनविले आहे.  मुळात लसीकरणाचा संबंध कोणत्याही महामारीशी नाही. अजेंडा २०३० धोरणामध्ये लसीकरण हा सर्वात मोठा म्हत्वाचा अवयव आहे.
मी मास्क वापरणार नाही अस मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले होते त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये त्यांच्या घरी कोरोनाने शिरकाव करून राज ठाकरे कोरोना बाधीत झाले होते. त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या आई आणि बहिणींनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती सर्वांनी कोरोनावर मात केली होती. (न्यूज १८ लोकमत १ जून २२) त्यानंतर राज ठाकरे व त्यांच्या परिवारातील लोकांनी वँक्शीनचे सर्व डोस ?पुर्ण केले असतील असे म्हणायला काही आडचण नाही. ठाकरे परिवाराने कोरोनावर मात करण्यासाठी जर सर्व डोस घेतले असतील तर राज यांना परत कोरोना झालाच कसा ?आयोध्या दौ-यातून पळवाट काढत राज ठाकरे यांनी आपल्या पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले. पण, त्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. (न्यूज १८ लोकमत १ जून २२) राज ठाकरेंना कोरोना झाला हे वाचून आश्चर्य वाटत कारण राज ठाकरे यांनी कोरोना लसीचे दोन व बुस्टरचा एक डोस घेतला नाही का ?जर घेतला नसेल तर का घेतला नाही ?आणि घेतलाच असेल तर या हनुमान भक्त राज ठाकरेंना परत कोरोना कसा झाला ?लसीचे डोस घेऊनही कोरोना होणारच असेल तर सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकारी व प्रशासकीय टीमकडून नागरीकांना जी बळजबरीने लस दिली होती त्याचा उपयोग काय झाला ?
कोरोनाची लस नागरिक घेत नव्हते कारण त्या लोकांना ब-यापैकी कोरोना व लसीबद्दल संशय येत होता पण सरकारने वेगवेगळे निर्बंध लावत या नगरीकांची कोंडी केली त्यामुळे नाईलाजाने त्यांना लस घ्यावी लागली. पण जे लोक सोशल हेल्थ मुव्हमेंट किंवा अव्हेकन इंडिया या चळवळींच्या संपर्कात होते त्यांनी प्रशासनाच्या बळजबरीला कागदोपत्री अश्व लावून बळजबरीने दिल्या जाणा-या लसीचा विरोध तर केलाच पण त्यांच्या एकाही पदाधिकारी कार्यकर्त्यांने लस घेतली नाही. त्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला कोरोनाने काहीही केल नाही ही गोष्ट अभिमानास्पद आहे. ज्यांनी लसच घेतली नाही त्यांना कोरोना झालाच नाही. पण ज्यांनी लस घेतली त्यांना कोरोना होतो ?. राहुल गांधी हे म्हणतात की, केंद्र सरकारने बुस्टर डोसची माझी सूचना मान्य केली आहे. हे एक योग्य पाऊल आहे. लस आणि बुस्टरची सुरक्षा देशातील लोकांपर्यत पोहोचवावी लागेल. अस म्हणाले होते त्या राहुल गांधीच्या मातोश्री कोरोना बाधीत निघाल्या आहेत. कारण काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी गेल्या काही दिवसांत ज्या नेत्यांना भेटल्या त्यातील काही नेतेदेखील कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. सोनिया गांधी यांना काल संध्याकाळी सौम्य स्वरुपाचा ताप आला. यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (लोकमत २ जून २२) जे राहुल गांधी लोकांना बुस्टरचा डोस ठासण्यासाठी सरकारकडे मागणी करतात ते सोनिया गांधींना लस आणि बुस्टरचा डोस का देऊ शकले नाहीत ?जर सोनिया गांधी यांनी बुस्टरचा डोस घेतला असेल तर परत कोरोनाची लागण कशी झाली ?जर लसच घेतली नसेल तर का घेतली नाही ?राहुल गांधी यांची वर्तवणुक म्हणजे 'बाहेरचीला साडी चोळी अन् घरची उघड फिरती ?असच नाहीतर कसे आहे.
केंद्र सरकारकडून रेमडेशिवीर हे इंजेक्शन घेऊन ते नागरीकांना ठासण्यासाठी जे सर्वात पुढे होते ते हेच नागपुरचे फडणवीस महाशय. एकीकडे रेमडेशिवीर हे विष असून ते शरीरासाठी घातक आहे अस काही डाँक्टर सांगत होते तर दुसरीकडे केंद्र व राज्य सरकार रुग्णांना ते विष देत होते. पण आमची बंदबुद्धी लोकही या विषासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाय-या झिजवुन नातेवाईकांसाठी विषाची मागणी करत होते. पण नंतर हेच रेमडेशिवीर नावाचे विषारी औषध सरकारने बंद केले. तेव्हा ज्यांनी आपल्या नातेवाईकांना हे विष देण्यासाठी अतोनात पैसा आणि वेळ खर्च केला ते नागरीक डाँक्टर, प्रशासन व सरकार यांच्या विरोधात आवाज न उठवता शांत चिडीचूप बसले ही खुप मोठी शोकांतिका आहे. केंद्राकडून लसीचा साठा घेऊन आपल्या भाजपा नेत्या मार्फत गल्लोगल्ली लसीकरण केंद्रे थाटत लोकांना लसवंत करण्याच्या नादात विषवंत करणारे देवेंद्र फडणवीस हे विना लसवंत कसे ?कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरवरुन दिली आहे. सध्या ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी त्वरीत आपली तपासणी करुन घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच सर्वांनी स्वत: ची काळजी घ्यावी असेही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. (एबीपी माझा ५ जून २२) लसीचा व बुस्टरचा डोस विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी घेतला नाही का ?का घेतला नाही ?जर घेतला असेल तर परत कोरोना कसा झाला ?या प्रश्नांची उत्तरं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील देतील का ?ज्याप्रमाणे जनावरांना खुरकुताचे इंजेक्शन देण्यासाठी गावातील मुख्य ठिकाणी संपुर्ण गावची जनावरे एकत्रित करून त्यांना लस दिली जाते त्याप्रमाणे महाविकास आघाडी व भाजपच्या समर्थकांकडून लसीकरण केद्रे सुरू करून लोकांना लसीच विष ?ठासण्यात आलं. पण ज्यांच्या एका इशा-यावर हे भक्त गल्लोगली उन्माद व उत्पात माजवतात ते राजकीय नेते लसीकरण न करता सुसाट वेगाने महाराष्ट्रात फिरत होते. म्हणजेच या भक्तांना लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत पण स्वतःच्या डोळ्यातल मुसळ दिसत नाही अशी गत या श्वानपुच्छ अंधभक्ताची आहे अस म्हटल तर कोणताही बुध्दीवान माणूस हे नाकारू शकणार नाही.  
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२१ साठी 'सीरम इन्स्टिट्यूट ची निवड झाली होती या सीरस च्या संचालक खा. सुप्रिया सुळे असून त्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात म्हणाल्या की, सीरममुळे आपले जनजीवन पूर्वपदावर येत आहे. (दै. देशोन्नती १७ नोव्हें २२) सीरममुळे आपल जनजीवन पुर्वपदावर येत आहे अस म्हणणा-या खा. सुळे यांना आ. अजित पवारांच्या नाकावरच झाकण दिसत नाही का ?त्याचं जनजीवन पुर्वपदावर आल नाही का ?सीरमची लस घेऊनही अजित दादा जर तोंडावरच झाकण काढणार नसतील तर खा. सुळेंनी आपल्या घरच्या लोकांच जनजीवन सुरळीत झाले का याचा प्रथम शोध घ्यावा ?एकीकडे शरद पवार हे सीरमचे आदर पुनावाला यांचे कौतुक करतात तर दुसरीकडे गोरखुरचे भाजपा आमदार म्हणतात की, आदर पुनावाला, तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट आहात. (दै. लोकाशा २३ एप्रिल २२) आदर पुनावाला व त्यांचे सिरमचे संचालक हे खरच एखाद्या दरोडेखोरांपेक्षा कमी नाहीत हे योग्य आहे कारण दरोडेखोर केवळ पैसा व संपत्तीवर दरोडा टाकून लूट करतो पण आदर पुनावाला व त्यांचे संचालक मात्र लोकांच्या जगण्यावरच दरोडा टाकून त्यांच्या शरीराची व संपत्तीची लुट करत आहेत. कारण 'अँस्ट्राजेनेकाच्या कोरोना लशीत चिंपाझीमधील अँडेनोव्हायरसचा वापर केल्याने या लशीमुळे मंकीपाँक्स पसरत आहे असे सोशल मिडीयावर बोलल जात आहे त्यावर पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वैज्ञानिक विनिता बाल म्हटल्या की, अँडेनोव्हायरस आणि पाँक्सव्हायरसचा एकमेकांशी संबंध नसून मंकीपाँक्सपेक्षा हा त्वचारोग वेगळ्या प्रकारचा आहे, 'अँस्ट्राजेनेकाच्या लशीमध्ये चिंपाझीतील अँडेनोव्हायरस व्हेक्टरचा वापर केला असला तरी विषाणू मानवी शरीरात वाढू नये म्हणून त्याचे उत्परिवर्तन करण्यात आले आहे. हा व्हेक्टर लशीतील घटक मानवी शरीरात वाहून नेतो.' (दै.सकाळ ०३ जून २२).
लसीकरणाची सक्ती करता येणार नाही असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे पण प्रशासकीय अधिकारी जर बळजबरीने लस देण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचेवर भादवि १६६, ११५, ५२, ४०९, १२० (बी), ३४, १०९  आणि आपत्ती निवारण कायदा, २००५ चे कलम ५१ (बी), ५५ अंतर्गत फौजदारी कारवाई करता येऊ शकते असे देशभरातील विविध विधीज्ञ संघटना व इंडियन बार असोसिएशनच्या मांध्यमातून सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी आधी वँक्शिन कशी आहे त्यावर संशोधकांनी केलेले दावे अभ्यासले पाहीजेत कारण वँक्शिनचे शोधकर्ते डाँ. राबर्ट मेलोन म्हणतात की, लसीमुळे आपल्या शरीरात मातृ पितृ सेल्समध्ये वायरल जीन घातला जातो. या जीन्समुळे संपुर्ण शरिरामध्ये विषाक्त स्पाईक प्रोटीन सतत तयार होत असल्याने कोशिका, ब्रेन, ह्दय आणि प्रजनन अंगामध्ये क्लाट्स तयार होतात.  या लसीकरणामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकार शक्तीमध्ये मुलभूत बदल होतात. ही जेनेरिक लस आहे, यामुळे झालेले दुष्परिणाम बदलले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो. (दै. देशोन्नती १५ जाने २२) त्यामुळे तरुणांनो नेत्याने वँक्शिन घेतली म्हणून तुम्ही घेऊ नका. प्रशासनाने बळजबरीने लस देण्याचा प्रयत्न करू नये, कारण उत्तर पश्चिम पाकीस्तानमध्ये पोलिओ लसीकरणाला विरोध दर्शवला होता पण असेच एकदा पोलिओची लस देण्यासाठी एक पथक गेले असता एका बंदुकधारी इसमाने त्या पथकावर गोळीबार केला त्यात एकजण जागीच ठार झाला होता. (दै. देशोन्नती १३ डिसें २२) त्यामुळे भारतात बळजबरीने लसीकरण करणा-या डाँक्टरांनी थोडस डोक ताळ्यावर ठेवाव अन्यथा वँक्शिन विरोधात चिडलेला तरुण वरीलप्रमाणे कृती करेल तेव्हा नवल वाटू देऊ नका. कारण त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही कधीही हिरावून घेऊ शकत नाहीत.

ताज्या बातम्या

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट. 26 July, 2024

अपंग व्यक्तींला दिला आधार, विजय चोरडिया यांनी तिन चाकी सायकल दिली भेट.

वणी:- वणी शहरातील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवक विजय चोरडिया यांनी गोकुळ नगर येथील अपंग व्यक्तींना...

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी. 26 July, 2024

वरोरा टप्प्यावरुन वणीचे प्रवासी बसमध्ये बसविण्याची मागणी.

वणी :- वरोरा मार्गाने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपुर ते चंद्रपुर व वणी करीता बसेस धावत असतात. परंतू चंद्रपुर...

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी  देण्यात यावी 26 July, 2024

दिव्यांगांच्या स्थानिक आमदार निधीतून तीन चाकी स्कुटी देण्यात यावी

वणी:स्थानिक आमदार निधीतून दिव्यांग व्यक्तिकरिता 30 लाख रुपये खर्च करायचा असतो.याच निधीतून दिव्यांग व्यक्ती करिता...

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब. 25 July, 2024

कलेला सामाजिकतेची किनार देणारा डाॅ. विनोदकुमार आदे, शेकडो कला लिलया अवगत करण्याचे कसब.

वणी:- एकतरी कला असावी अंगी , तेव्हाच वाजेल जीवन जगायाची पुंगी या वाक्यप्रचारा प्रमाणे शेकडो कला लिलया अवगत करणारा...

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित 25 July, 2024

सरपंच तुकाराम माथनकर “अभिमान गौरव महाराष्ट्रचा “ पुरस्काराने सम्मानित

वणी - होटल कोणार्क येंल बी नागपूर येथे दिनांक २१ जुलै रोजी प्रयास बहुउद्देशीय सेवा संघाचा रौप्य महोत्सव पार पडला...

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू. 25 July, 2024

रंगकाम करताना खाली पडून पन्नास वर्षीय इसमाचा मृत्यू.

वणी:- कलरचे काम करीत असताना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना आज दुपारी...

आरोग्यतील बातम्या

सोमवारी जिल्ह्यात 12 कोरोनामुक्त तर 1 बाधित ।। ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 130

चंद्रपूर दि. 21 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

शुक्रवारी जिल्ह्यात 116 कोरोनामुक्त तर 63 नवे बाधित

चंद्रपूर दि. 11 फेब्रुवारी : गत 24 तासात जिल्ह्यात 116 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात...

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 24 तासात 35 कोरोना पॉझिटिव्ह ; 201 कोरोनामुक्त

वणी: गेल्या 24 तासात जिल्ह्यात 35 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले तर 201 जण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या ॲक्टीव्ह...