मटका अड्ड्यावर आमदारांची धाड..! पण पाणी, वीज समस्या कधी सुटणार?
वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...
Reg No. MH-36-0010493
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
*महसूली प्रश्न-उत्तरे,*
*ग्राहक साक्षरता अभियान*
*प्रश्न* पिक पाहणी करतांना प्रमुख्याने काय चुका होतात?
*उत्तर* महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका-खंड४ प्रकरण दोन, परिछेद ४ आणि ५ मध्ये नमूद केल्याप्रमाणे पीक पाहणीची कामे वर्षात दोन वेळा करायची असतात.
१. खरीप हंगामात (०१ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर)
२. रब्बी हंगामात (१५ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी)
★पिके जेव्हा शेतात उभी असताना त्या काळात पिक पाहणी न केल्यावर तोंडी माहितीनुसार नोंदी घेतल्या जातात.
★तलाठी व्यक्तीश: शेतावर जाऊन पिक पाहणी करत नाहीत.
★पिक पाहणी ठरलेल्या कालावधीत सुरू होत नाही आणि ठरलेल्या कालावधीत संपवली जात नाही.
★पिक पाहणी भेटीची गावी दवंडी देणे, दवंडी रजिस्टरला नोंद घेणे, गावकऱ्यांना आणि संबधितांना सूचना देणे या गोष्टी केल्या जात नाही.
★शेत मालक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांच्या अनुपस्थितीतच पिक पाहणी करण्यात येते.
★ पिक पाहणी प्रथम नमुना ११ भरणे आवश्यक असतांनाही तो न भरताच गाव नमुना क्रमांक १२ लिहिला जातो.
★ तलाठी यांनी केलेली पिक पाहणी, मंडल अधिकारी तपासत नाहीत.
★सध्याच्या संकरीत बियाणे लागवड पध्दतीमुळे कापणी लवकर केली जात असल्यामुळे. खरीप हंगामात पिक पाहणी सप्टेंबर पर्यंत तर रब्बी पाहणी ३१ डिसेंबरपर्यंत संपविली जात नाही.
★ काही ठिकाणी उन्हाळी भुईमुग, उन्हाळी कांदा इत्यादी पिकांची लागवड जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात केली जाते. त्यांची पिक पाहणी केली जात नाही.
★जे पीक खरोखरच शेतात उगवले गेले आहे त्याची आणि जितक्या क्षेत्रावर ते पिक उगवले गेले आहे त्या क्षेत्राची अजून नोंद घेतली जात नाही.
★शेतात उभ्या पिकासह त्या जमीनीतील कुळ हक्क, वहिवाटदार,सीमा चिन्हे. मिश्र पिके, झाडे, फळझाडे दुबार पिके, जल सिंचनाची माधने, नवीन विहीर, बोअरवेल, पोटखराब क्षेत्रात केलेली लागवड इ. तपासून दप्तरातील नोंदी अद्ययावत केल्या जात नाहीत.
★पिक पाहणी करतांना ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे क्षेत्र वहिवाटतांना, पिके घेताना, रस्ता तयार करतांना हद्दीच्या निशाणीचे नुकसान केलेले असते, हद्दीच्या निशाणीचे दगड, खुणा, निशाण्या जाणून-बुजून नाहीशा केलेल्या असतात किंवा बुजवून टाकलेल्या असतात, त्याचे विरुध्द महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ च्या कलम१४०/१ ४५ अन्वये कारवाई करण्यात येत नाही यामुळे महसूल खात्याचा वचक रहात नाही.
★मागील वर्षीच्याच वहिवाटदाराचे नाव खात्री न करता चालू वर्षीही लिहिले जाते. वहिवाटदार जिवंत आहे किंवा मयत याची खात्री केली जात नाही. त्यामुळे अनेक वर्षांपर्यंत मयताचे नाव वहिवाटदार सदरी तसेच लिहिले जाते.
★नमुना १४ चा फॉर्म तहसिलदारकडे मुदतीत पाठवला जात नाही.
★कुळ मयत असल्यास, त्याच्या वारसांची नोंद गाव दप्तरी न करताच, कुळाच्या वारसांची नावे वहिवाटदार सदरी लिहिली जातात.
★बागायती पिके कोणत्या पाण्यावर घेतली याची खात्री केली जात नाही.
लेखक - डॉ. संजय कुंडेटकर, (उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन)
शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर (रिअल इस्टेट कन्सलटन्सट), कोल्हापूर.
मोबाईल: 7350201000, 8459348218.
*जमिनीच्या वादाची कारणे:- कायदा नियमांचे अज्ञान, सामाजिक प्रतिष्ठा, इर्षा, महत्वाकांक्षा, व्देष, यांमुळे होणारी अडवणूक व बेकायदेशीर कामे, जनता व प्रशासनात सुसंवादाचा अभाव, योग्य सल्ल्याचा अभाव, अचूक कार्यपद्धतीची माहिती नसणे, सातबारा पुर्नलेखनामध्ये झालेल्या चुका, सातबारा संगणकीकरणामध्ये झालेल्या चुका, कुटुंबांतर्गत वाद इत्यादी.*
*विशेष निवेदन* - 140 कोटी भारतीयांचा सुखाचा जीवन कल्याणाचा मार्ग सांगणारे तसेच , शासन कारभारात पारदर्शकता आणि लोकसहभाग वाढवणे गरजेचे आहे म्हणून आपण आपल्या संग्रही *संविधान ग्रंथ* व *माहिती अधिकार अधिनियम 2005 असणे आवश्यकच आहे.*
सहकारी संस्थेचा सहकार कायदा (सोसायटी) व ओनरशिप कायदा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी श्री जगदीश काशीकर यांनी “जेकेके विकली न्युज बुलेटीन” (https://www.facebook.com/groups/485736278978687/) / (http://www.facebook.com/JKK-Weekly-News-Bulletin-111420427059697/) हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा व हा ग्रूप/पेज पसंद करुन त्यात सामिल व्हावे ही मनापासुन विनंती करत आहेत.
ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली चार ते पाच वर्ष तनावात असलेल्या मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीवर दिड वर्षभरापुर्वि प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी (देखभाल खर्च दर महिन्याला पाच हजार आकारूण) आपल्या ताब्यात घेतली होती व येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि राजकिय पाठिंबा व आर्थिक सुबत्ता असलेले सुशिक्क्षित गुंड प्रवृत्तिच्या गुन्हेगार सभासदांवर याेग्य ती कारवाई करून (अहवाल सादर करुन किंवा योग्य त्या शासन यंत्रणेकडुन पुढील कारवाई करूण) सोसायटी पुन्हा भविष्यात नवीन कमिटी स्थापुन नवीन सोसायटी कमिटी/सभासदांकडुन कोमल रहिवाशी सोसायटी व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे तसेच या विभागातील सर्व राजकिय पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच ईतर सामाजिक कार्यकर्ते रहिवाशी सोसायटीला कोणताहि आपला स्वार्थ्य न साधता कसे सहकार्य सोसायटीतील योग्य रहिवाश्यांना ही गंभीर समस्या सोडविण्यास मदत करणार आहेत हे मुबंई महानगर पालिकेच्या येणारया निवडणूका निमित्ताने सर्व विभागातील जनतेला/नागरिकांना दिसणार आहे व मुंबईकर जनतेने या घटनेवर योग्य पध्दति ने लक्ष ठेऊन येणारया सर्व निवडणूका मध्ये योग्य ऊमेदवारांना कोणताहि राजकिय पक्ष न बघता निवडुन देणे जनसामान्यांच्या हितासाठि तसेच या देशातील भारतीय जनतेसाठी फार महत्त्वाचे आहे.
अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.
या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा :- व्हाटसअप नंबर 9768425757.
सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.
वणी:- दोन दिवसांआधी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मटका अड्ड्यावर धाड मारून वणीकरांची मनं जिंकली. गेल्या ६ दिवसांपासून...
घुग्घुस- : पोलीस अधिक्षक श्री. सुदर्शन मुम्मका सा चंद्रपूर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्हया मध्ये...
मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...
मारेगाव: तालुक्यातील कुंभा ते बोरी गदाजी रोड सहा महिन्यातच उखडला असल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रशचिन्ह निर्माण...
*आ. सुभाष धोटेंनी केली जेवरा, लोणी च्या नुकसानग्रस्त घरांची पाहणी : तातडीने मदत पोहोचविण्याच्या प्रशासनाला सुचना* ✍️दिनेश...
*वेकोलीच्या शक्तिशाली ब्लाँस्टींगमुळे अनेक घरांना तडे* नुकसानग्रस्त गावकर्यांना मदत व प्रभावी उपाययोजना करण्याच्या...
*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...
भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...
भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...