वणी:- यवतमाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वर्षाताई निकम ह्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकी साठी वणी येथील विश्रामगृहात आल्या असता त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकार यांच्या सोबत चर्चा करून माहिती दिली की,वणी उपविभागात सतत शेतकरी आत्महत्या होत आहे.यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतातील उभे पिक वाहून गेले.दुबार पेरणी करावी लागली तरी शासनाचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आतापर्यंत दिली नाही.अल्पभुधारक शेतकरी हतबल झाले आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्ते साठी टोकाचे पाऊल उचलुन आत्महत्या करीत आहे. मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांना कर्ज देत नाही.त्यांनी शेतकऱ्यांना पिक पेरणी केल्याचे तलाठ्याचे प्रमाण पत्राची मागणी करीत आहे. स्वातंत्रा नंतर सुध्दा आज अन्न,वस्त्र,निवारा मिळात नाही, मजुरांना काम मिळत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. हेक्टरी मर्यादा न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी.
अशा परिस्थितीत जर केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार जर शेतकऱ्यांना न्याय देत नसेल तर आमचा पक्ष या प्रकरणी तिव्र आंदोलनाची भूमिका घेणार आहे.अशी भुमीका त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जिल्हा अध्यक्ष युवक राहुल कानारकर,प्रा.नलिनी चौधरी, अशोक राऊत, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विजय नगराळे, युवा यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष मुबीन पिरसाहब शेख, तालुका अध्यक्ष सुर्यकांत खाडे,यासह वणी,जरी,मारेगांव, येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.