वणी:- सरकार चळवळीच्या आधारावर १९७९ मध्ये स्वर्गीय लक्ष्मणराव इमानदार यांनी सहकार भारतीची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून व सहकार भारतीचे माध्यमातूनच केशव नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना २७ मार्च १९९२ रोजी राजेंद्रजी खटी यांचे पुढाकाराने वणी शहरात एका लहान जागेत संस्थेची स्थापना केली. व सहकार भारतीच्या माध्यमातूनच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत/ व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे काम हि संस्था करीत आहे. सुरुवातीलाच संघ विचारधारेमधून समाजातील सर्व लोकांना एकत्रित आणून संस्थेचे सभासद करून सभासदांमध्ये काटकसर व सहकार्याची भावना जागृत करण्यात प्रोत्साहित केले. सभासदांना बचतीची सवय लावणे गरजवंतांना कर्ज पुरवठा करून शेतकऱ्यांना सावकारांकडून व छोट्या छोट्या व्यवसायिकांना त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये वाढ करणे करिता व स्वतःचे पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला अगदी १०×१० च्या गळ्यापासून सुरू झालेल्या संस्थेचे भांडवल ३५ हजार रुपये होते. त्यावेळी शहरांमध्ये दोनच पतसंस्था होत्या लोकांच्या गरजा कमी होत्या. त्यावेळी संस्थेच्या चार लाख रुपयाच्या ठेवी होत्या व संस्थेत आठ दैनिक बचत प्रतिनिधी व आवर्ती ठेव प्रतिनिधी कार्यरत होते. त्यावेळी कर्जधारकांना पाच हजार ते दहा हजार रुपये कर्ज देण्यात येत होते. आज रोजी संस्थेमध्ये कर्जाच्या विविध योजना जसे की वैयक्तिक कर्ज, आकस्मिक कर्ज, मुदत ठेवी कर्ज, सोनेतारण कर्ज, शेतकरी व व्यापारी बंधू करीता व्हेअर हाऊस कर्ज, वस्तू खरेदी योजना, समृद्धी कर्ज,समरसता कर्ज,तारणी कर्ज,रोख ॠण कर्ज, उपलब्ध करून दिलेले आहे. तसेच सभासदाकरिता कर्जाची मर्यादा चाळीस लाख रुपये पर्यंतचे आहे. संस्थेने भाजीविक्रेता, स्टेशनरी
वर्क, चहा टपरी, पान सेंटर, छोटे हॉटेल, फर्निचर विक्रेता, इतर छोटे उद्योगा करिता कर्ज उपलब्ध करून दिले आहे. व सभासदांचा समाजामध्ये आर्थिक स्तर उंचावण्याचे कार्य ही संस्था करीत आहे.या आर्थिक वर्षाअखेर एकुण ८०७४ सभासद आहेत. संस्थेच्या आज रोजी ठेवी ९२ कोटी रुपये आहे.
या संस्थेला आत्ता पर्यंत ६ पुरस्कार मिळाले आहेत.१९९२ ला सुरू झालेल्या केशव नागरी पतसंस्थेच्या वणी,आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, यवतमाळ येथे शाखा कार्यरत आहे. तसेच उमरखेड येथे शाखा प्रस्तावीत आहे. हि संस्था प्रगतीकडे वाटचाल होत असताना कार्यविस्तार अधिक सुनियोजित पद्धतीने व्हावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्व सोयीने सुसज्ज अशी केशवस्मृती
नावाची संस्थेची मुख्य कार्यालयाची वास्तू निर्माण केली.
या नविन वास्तूचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा आज दिनांक २७ सप्टेंबर २०२३, रोजी दुपारी
४ वाजता डॉ.तुगणायक यांच्या दवाखान्या समोर, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक सुनिलजी देशपांडे अखिल भारतीय सह.संपर्क प्रमुख रा.स्व.
संघ. विशेष अतिथी म्हणून विवेकजी जुगादे.प्रदेश महामंत्री सहकार भारती, महाराष्ट्र राज्य.
प्रमुख अतिथी म्हणून हंसराजजी अहिर,अध्यक्ष मागासवर्गीय आयोग भारत सरकार, मदनभाऊ येरावार, माजी राज्यमंत्री तथा आमदार यवतमाळ.संजिवरेड्डी बोदकुरवार आमदार वणी.बंडूजी
भागवत, तालुका संघ चालक, नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.तारेंन्द्र बोर्डे, जिल्हा अध्यक्ष भाजपा यवतमाळ. व कार्यकर्त्यांचे अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर खोंड हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केशव नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाने केले आहे.