नागभिड--
खरीप पणन 2021-22 या वर्ष करीता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्याची मुद्त 31जानेवारी2022पर्यत शासनाने दिली आहे, पंरतु धानाची विक्री करण्याकरीता असंख्य शेतकऱ्यांनी आनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमाल धान विहीत मुद्तीत खरेदी करणे शक्य होत नाही,यांचे खरे कारण ऐनवेळी अवकाली पावसाने सतत आठ दिवस थयमान घातल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे,
एवढेचं नव्हेतर धान चुरणा करण्यास शेतजमीन ओली असल्याने थ्रेशर मशिन शेतात जावू शकत नाही ही महत्वाची अडचन शेतकऱ्यांसमोर होती,त्यामुळे हंगामाला ऊशीर झाला आहे.
शेतकऱ्यांचे धान शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर निधाॅरित मुद्तीत धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यास अडचन निर्माण झालेली असुन माहे जानेवारी 22 पर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी होऊच शकत नाही, करीता शेतकऱ्यांची ही महत्याची अडचन लक्षात घेवून खरीप हंगाम 2021-22 करीता पूर्वि देण्यात आलेली मुद्त शेतकऱ्यांच्या हिताच्या दुष्टिने पुढे दिनांक 31मार्च2022 पंर्यत वाढवून देण्यात यावी,
खरीप हंगाम धानपिक संपूर्ण चंद्रपुर जिल्हा घेत असुन जिल्हा मधील सर्व शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर जमीन 7/12 ऑनलाईन नोंदणी केला असुन फक्त नागभिड सहकारी खरेदी विक्री संस्था मधेच 2000 हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदनी झाली आहे, आधारभूत धान खरेदी केंद्र हे 1डिंसेबर 2021 सुरु झाले,31डिंसेबर पंर्यत 300 शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्र वर आपले धान आणावे असे मोबाइल द्वारे मॅसेज सोंडण्यात आले,त्यावेळी 8,000हजार किक्टलं धान खरेदी नी गोडांम भरले , डी,ओ न भेटल्या मुळे 15 दिवस खरेदी केंद्र बंद होती, नंतर 15जानेवारी 2022पंर्यतअवकाली पाऊसाने खरेदी बंद होती,ऊरवरीत सर्व1500 शेतकऱ्यांना मोबाईल दा्रे आपले धान आधारभूत क्रेंद्रावर आणावे असे मॅसेज पाठविण्यात आले,त्यानुसार सहकारी खरेदी विक्री संस्था च्या आवारात शेतकऱ्यांनी विक्री करीता धान आणून ठेवले आहेत,फक्त दिनांक 28/1/2022 पंर्यत 500 शेतकऱ्यांचे 16,000 हजार च्या जवळ पास धानाची खरेदी केंद्रावर झाली आहे,
सवॅ जिल्हा मधील खासदार,आमदार, मंञी महोदय यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेवून राज्य शासनाचे अन्न नागरी पुरवठा मंञी नाम,छगन भुजबळ यांच्या कडे मुद्त वाढ मिळण्याबाबत पञ व्यवहार करावे,तसेच चंद्रपुर जिल्हा माकॅटिंग पणन अधिकारी मा,अनिल गोगीरवार सरांनी सुद्या पञ व्यवहार करावे, मुद्त वाढ न मिळाल्यास जिल्हा मधील शेतकरी वर्ग तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा शेतकरी देत आहेत