भारतीय वार्ता :यवतमाळ शहर प्रतिनिधी :गणेश खडसे *
यवतमाळ,दि.६ मार्च (जिमाका):-
प्लास्टिक वजनाने हलके व वापरण्यासाठी सोपे झाल्याने लोकांचा याकडे कल
वाढलेला आहे. नागरिकांना भाजीपाला घेण्याकरिता आता सोबत कापडी पिशवी नेण्याची सवय राहीली नाही. आज सामानासोबत आपण बाजारातुन भरपूर प्लास्टिक घरी घेऊन येतो. मात्र प्लास्टिक पर्यावरणासाठी घातक असुन त्यामुळे प्रदूषण तर होतेच पण त्यांची विल्हेवाट लावणे कठिण आहे. त्यामुळे नागरिकांनी कापडी पिशवीचाच वापर करावा आणि पर्यावरण वाचवावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
घरा बाहेर पडता आहात,मग कापडी पिशवी सोबतच ठेवा.असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी याप्रसंगी बोलतांना प्लास्टिक पर्यावणासाठी किती घातक आहे.याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच मोफत पिशवी वाटप कार्यक्रमाच्यावेळी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.