*भारतीय वार्ता :गणेश खडसे
यवतमाळ, दि. १ मार्च(जिमाका):- जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी ६ मार्चला बळीराजा चेतना भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. जनतेच्या तक्रारी, अभिकथने, गाऱ्हाणी ऐकुन त्या स्विकारुन कार्यवाही करण्यात येईल.
नागरिकांना प्रत्यक्ष लोकशाही दिनात उपस्थित राहणे शक्य होत नसल्यास त्यांनी लोकशाही दिनाच्या दिवशी म्हणजेच ६ मार्चला सकाळी १० वाजेपर्यंत आपला तक्रार अर्ज rdc_yavatmal@rediffmail.com या ई मेल वर सादर करावा.
सदर ई मेलवर पाठविलेला तक्रार अर्ज सुध्दा लोकशाही दिनात समाविष्ट करुन घेण्यात येईल, परंतु ६ मार्च २०२३ ला सकाळी १० नंतर ई मेलवर प्राप्त झालेला तक्रार अर्ज लोकशाही दिनात ग्राहय धरल्या जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.
०००००००