वणी:- वर्धा नदीवरील यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्याला जोडणाऱ्या मुंगोली येथील पुलाचे काम सा.बां.विभागाने त्वरित सुरू करावे असे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सुधिर मुनगंटीवार,
मंत्री वने व संस्कृतीक कार्य मस्त्यविभाग यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, वर्धा नदी मुंगोली येथे राज्य रस्ते विकास महामंडळ व वेकोली वणी एरिया यांनी सामंजस्य करार करून २९१७ मध्ये कोळसा व सार्वजनिक वाहतुकी करिता वर्धा नदीवर चंद्रपूर विभागाकडून विभागाकडून पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या पुलावरून मुंगोली पैनगंगा, कोलगांव खाणीतील कोळसा वाहतूक व मुंगोली, माथोली, कैलास नगर, जुगाड, साखरा, कोलगांव, शिवनी, टाकळी, चिखली, येनक, येनाडी, चनाखा, परमडोह, शिंदोला परिसरातील
नागरिकांची नागरीकांची ये जा या पुलावरून होत होती. डिसेंबर २०२२ मध्ये या पुलाचा पिल्लर झुकल्या मुळे हा पुल जड वाहतुकिस बंद करण्यात आला.
त्यानंतर वेकोलीने वर्धा नदीवर तात्पुरता पुल बांधण्यात आला.तो पुल मे २०२३ मध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे वाहून गेला. तेव्हा पासून वेकोलीची घुग्गुस येथे येणारी कोळसा वाहतूक शिंदोला शिरपूर मार्गे
घुग्गुस रेल्वे साईडिंग येथे येत असल्याने या परिसरात धुळ,प्रदुर्षण,व रात्र दिवस कोळसा वाहतूकीने रस्त्याची अवस्था दैयनिय झाली आहे.त्याचा त्रास रस्त्या लगतच्या शेतकऱ्यांना व नागरिकांना विनाकारण सहण करावा लागत आहे. अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढले आहे.
नदीवरील नविन पुलाच्या बांधकामासाठी वेकोलीने एकुण किंमतीच्या ३० टक्के रक्कम चेक द्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांचे कडे जमा केली.
५ महिने होऊन सुद्धा बांधकाम विभागाने अद्यापही नविन पुलाच्या बांधकामासाठी कारवाई केलेली दिसत नाही.तरी या पुलाचे बांधकाम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी केली आहे.